मेलबर्न – कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नाबाद शतक व त्याने रवींद्र जडेजाच्या साथीत केलेल्या दमदार भागीदारीच्या जोरावर भारताने यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीवर रविवारी दुसऱ्याच दिवशी पकड घेतली आहे.
दुसऱ्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवण्यात आला तेव्हा भारताने आपल्या पहिल्या डावात 5 बाद 277 धावा केल्या असून आता संघाकडे 82 धावांची आघाडी आहे. कर्णधार रहाणे 104 धावांवर तर, रविंद्र जडेजा 40 धावांवर खेळत आहेत.
रविवारी भारताने 1 बाद 36 धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. शुभमन गिल व चेतेश्वर पुजार यांनी कालच्या धावसंख्येत 30 ची भर घातली. गिल अर्धशतकाच्या जवळ आलेला असताना पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर 45 धावांवर बाद झाला. त्यानंतर पुजारा 17 धावांवर परतला. 3 बाद 64 अशी बिकट अवस्था असताना कर्णधार रहाणेने हनुमा विहारीच्या साथीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या जोडीने अर्धशथकी भागीदारीही केली. मात्र, ऑफ स्पीनर नाथन लॉयनने विहारीला 21 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर ऋषभ पंतने रहाणेसह डाव सावरला. पंतने आक्रमक फलंदाजी केली. मात्र, अत्यंत अनावश्यक फटका मारून पंत 29 धावांवर बाद झाला. अर्थातत्यापूर्वी त्याने रहाणेसह अर्धशतकी भागीदारी केली. दरम्यान रहाणेने अर्धशतक पूर्ण केले.
पंतच्या जागी आलेल्या रविंद्र जडेजाने मात्र, रहाणेलासुरेख साथ दिली. त्याने सुरुवातीला एकेरी धावा घेत धावफलक हलता ठेवला. या जोडीने त्यानंतर धावांचा वेग वाढवला आणि संघाला आघाडी मिळून दिली. त्याचवेळी रहाणेने चौकार फटकावताना 12 वे कसोटी शतक साजरे केले. त्याने 200 चेडूंत 12 चौकारासंह नाबाद 104 धावा केल्या. जडेजाने 104 चेंडूत नाबाद 40 धावा केल्या. त्यावेळी ही आघाडी आणखी वाढली असती मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे खेळ काहीषटके आधीच थांबवण्यात आला. खेळ थांबला तेव्हा भारताने पहिल्या डावात 82 धावांची आघाडी मिळवली आहे. आता सोमवारी तिसऱ्या दिवशी भारतीय संघ ही आघाडी आणखी कीती वाढवतो यावरच या कसोटीतील त्यांचा विजय अवलंबून राहणार आहे.
पुजाराची बॅट शांतच
चेतेश्वर पुजारा या कसोटीत पहिल्या डावात पुन्हा एकदा अपयशी ठरला. गेल्या दोन वर्षांत त्याला एकही शतक फटकावता आलेले नाही. या सामन्यात तो केवळ 17 धावा काढूऩ बाद झाला. पहिल्या ऍडिलेड येथे झालेल्या कसोटीत पहिल्या डावात 43 तर, दुसऱ्या डावात 0 धावावर पुजारा बाद झाला होता. बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या डावात त्याने तब्बल 70 चेंडूचा सामना करताना 17 धावा केल्या. पुजाराला गेल्या 17 कसोटी डावात एकही शतक साकार करता आलेले नाही. दोन वर्षापूर्वी पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीत 193 धावांची खेळी केली होती.
रहाणेची अनोखी कामगिरी
बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात दोन शतके फटकावण्याचा मान रहाणेने मिळवला. 2014 साली झालेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात रहाणेने 147 धावांची खेळी केली होती. 1999 मध्ये बॉक्सिंग डे कसोटीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शतकी खेळी केली होती.वीरेंद्र सेहवागने 2003, विराट कोहलीने 2014 तर, पुजाराने 2018 साली बॉक्सिंग डे कसोटीत शतक फटकावले होते.
मेलबर्नवर सर्वाधिक शतके फटकावणाऱ्या खेळाडूंत रहाणे हा विनू मंकड यांच्यासह पहिल्या क्रमांकावर आहे. मेलबर्नवर रहाणेचं हे दुसरे शतक ठरले. यापूर्वी विक्रमादीत्य सुनील गावसकर, कोहली, पुजारा, सेहवाग, सचिन व गुंडाप्पा विश्वनाथ यांनी या मैदानावर शतकी खेळी केली आहे. कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियात शतक साकार करणारा रहाणे पाचवा खेळाडू ठरला आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक शतक झळकावणारा रहाणे पहिलाच फलंदाज ठरला आहे. मेलबर्नवरचे शतक रहाणेचे या स्पर्धेतील तिसरे शतक ठरले.
संक्षिप्त धावफलक –
ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 195. भारत पहिला डाव – 91.3 षटकांत 5 बाद 277 धावा. (चेतेश्वर पुजारा 17, हनुमा विहारी 21, ऋषभ पंत 29, शुभमन गील 45, अजिंक्य रहाणे खेळत आहे 104, रवींद्र जडेजा खेळत आहे 40, मिशेल स्टार्क 2-61, पॅट कमिन्स 2-71, नाथन लॉयन 1-52).