सिडनी – सलामीवीर मॅथ्यू वेडच्या अर्धशतकी आणि स्टिव्ह स्मिथच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 195 धावांचे आव्हान दिले आहे. भारताने टाॅस जिंकून गोलंदाजी स्विकारताना ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 षटकांमध्ये 5 गडी गमावत 194 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मॅथ्यू वेडने 32 चेंडूत 10 चौकार व 1 षटकारांसह सर्वाधिक 58 धावा केल्या. तर स्टीव्ह स्मिथने 38 चेंडूत (3 चौकार व 2 षटकार) 46 धावा केल्या. तसेच ग्लेन मॅक्सवेल आणि मोईसेस हेनरिकेसने उपयुक्त खेळी केली. मॅक्सवेल आणि हेनरिकेसने प्रत्येकी 22(13) आणि 26(18) धावांची खेळी केली. मार्कस स्टोइनिसने नाबाद 16 आणि डॅनियल सॅम्सने नाबाद 8 धावा केल्या.
भारताकडून गोलंदाजीत नवोदित गोलंदाज टी नटराजन याने 4 षटकांत 20 धावा देत सर्वाधिक 2 गडी बाद केले. शार्दुल ठाकूर (4 षटकांत 39 धावा) आणि युजवेंद्र चहल (4 षटकांत 51) यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
धावफलक – ऑस्ट्रेलिया फलंदाजी : 194/5(20.0)
मॅथ्यू वेड 58(32), स्टीव्ह स्मिथ 46(38), मोइसेस हेनरिक्स 26(18), ग्लेन मॅक्सवेल 22(13).
भारत गोलंदाजी : नटराजन 2/20(4),शार्दुल ठाकूर 1/39(4),युजवेंद्र चहल 1/51(4).