नवी दिल्ली – नागपूर कसोटीत पराभव ऑस्ट्रेलियाच्या चांगालच जिव्हारी लागल्याचे त्यांच्या थयथयाटावरून सिद्ध होत आहे. दिल्लीला होत असलेल्या दुसऱ्या कसोटीपूर्वी नागपूरमध्येच काही काळ थांबून त्यांच्या संघाला सराव करायचा होता. मात्र, ही परवानगी नाकारल्यामुळे आता त्यांची रडारड सुरु आहे. याबाबत बीसीसीआयची तक्रार थेट आयसीसीकडेच करण्याची त्यांची तयारी सुरु झाली आहे.
नागपूरच्या जामठा मैदानावर ही कसोटी संपल्यावर ग्राउंड्समननी खेळपट्ट्यांवर पाणी मारल्यामुळे त्यांना सराव करणे शक्य नव्हते. तसेच हा सामना अवघ्या अडीच दिवसांतच संपल्यामुळे दिल्ली कसोटीला भरपुर वेळ असल्याने त्यांना फिरकीला साध देत असलेल्या जामठाच्याच खेळपट्टीवर सराव करायचा होता. मात्र, देशांतर्गत स्पर्धांसाठी हे मैदान सज्ज ठेवण्यासाठी विदर्भ क्रिकेट संघटनेने याची तयारी सुरु केली व रोलिंगपूर्वी खेळपट्टीवर पाणीही फवारले गेले. अशी स्थिती असताना सरावाची परवानगी देणे बीसीसीआयला सख्य नव्हते. मात्र, ही सगळी परिस्थीती माहिती असूनही ऑस्ट्रेलियाने हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनवला असून आयसीसीकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि 132 धावांनी दारूण पराभव पत्करावा लागल्याने त्यांची चीडचीड झाली आहे. तसेच हा पराभव जीव्हारी लागल्याचेच त्यांच्या या निराशाजनक कृतीतून सिद्ध होत आहे. रवीचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा आणि अक्सर पटेल यांच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही डावांची वाताहत झाली. पहिल्या डावात त्यांना 177 धावा करता आल्या तर दुसऱ्या डावात अवघ्या 91 धावांवर ते कोसळले होते. आता दिल्ली कसोटीत तरी फिरकीसमोर जिद्दीने उभे राहून फलंगदाजी करणे सरावाशिवाय शक्य नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यामुळेच त्यांना नागपूरच्याच खेळपट्टीवर सराव करायचा होता. आता त्यांचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू इयान हिली यांनीही खेळाडूंच्या मताला दुजोरा देत आयसीसीने यात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.
याच हिली यांनी या मावलिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारता, येण्यापूर्वीच बीसीसीआयवर टीका केली होती. सरावासाठी वेगळी व प्रत्यक्ष सामन्यासाठी वेगळी खेळपट्टी देत बीसीसीआय फसवणूक करते आसा आरोपही हिली यांनी केला होता. आता पहिल्या कसोटीत पराभव झाल्यावर त्यांनी पुन्हा एकदा बीसीसीआयला ल्य केले आहे.
खेळपट्टी व क्युरेटरवर फोडले खापर
नागपूरच्या कसोटीतील पराभवासाठी आपल्या फलंदाजीत झालेल्या चुका लपवत ऑस्ट्रेलियाने भारतातील खेळपट्ट्या व त्या तयार करत असलेल्या क्युरेटर यांनाच जबाबदार धरले आहे. नागपूरची खेळपट्टी कसोटी क्रिकेटसाठी आदर्श नव्हती असा रागही त्यांनी आता आळवायला सुरुवात केली आहे. या मालिकेत आता उर्वरित सामन्यांसाठी कसोटीसाठी योग्य खेळपट्ट्या मिळव्यात यासाठी आयसीसीनेच हस्तक्षेप करावा असेही त्यांच्या संघ व्यवस्थापनाने म्हटले आहे.
खरी भीती अश्विन-जडेजाचीच
पराभवाची काहीही कारणे ऑस्ट्रेलियाने संघाने दिली तरी त्यांची खरी भीती अश्विन व जडेजा यांची फिरकी गोलंदाजीच आहे हे तर उघड होत आहे. भारतीय खेळपट्टीवर या जोडीची फिरकी गोलंदांजी खेळणे त्यांना कठीण जाते हे अनेकदा दिसले आहे. यंदाचा दौराही त्याला अपवाद राहिलेला नाही. त्यामुळे याच फिरकीच्या दहशतीखाली त्यांना ही मालिकाच अत्यंत वाई पद्धतीने गमावण्याचा धोका दिसत असल्यानेच हा सगळा अकांड तांडव सुरू आहे.
सराव सामने नाकारल्याचाच परिणाम
या मालिकेसाठी भारतात दाखल झालेल्या ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्याच चुका भोवत आहेत. त्यांनी यंदा इतिहासात पहिल्यांदाच भारतात कसोटी मालिकेपूर्वी सराव सामने खेळण्यास नकार दिला होता. वेगवेगळ्या खेळपट्ट्या मिळतील असे आरोप करत त्यांनी पहिल्यांदाच सराव सामने न खेळण्याचा निर्णय गेतला होता व त्याचाच त्यांना फटका बसत आहे.