पाॅटचेफस्ट्रूम : भारत-आॅस्ट्रेलिया दरम्यान आज १९ वर्षाखालील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचा सामना होत आहे. भारतीय संघाने साखळी फेरीतील तिन्ही (श्रीलंका, जपान, न्यूझीलंड) सामने जिकूंन उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तर आॅस्ट्रेलियाने तीन सामन्यातील दोन सामने ( नायजेरिया,इंग्लंड) जिकंत उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यांचा सलामीच्या सामन्यात विंडिजविरूध्द पराभव झाला होता.
सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार असून नाणेफेकीचा कौल हा आॅस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आहे. आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केले आहे.
In the Super League quarter-final Australia have won the toss and will bowl first against India.#U19CWC | #INDvAUS | #FutureStars pic.twitter.com/nkPYjDRT4N
— Cricket World Cup (@cricketworldcup) January 28, 2020
दरम्यान, २०१३ पासून १९ वर्षांखालील गटात भारत-आॅस्ट्रेलिया ५ वेळा आमनेसामने आले आहे. यात ४ लढती भारताने जिंकल्या आहेत तर १ लढत पावसामुळे अनिर्णित राहिली आहे.