औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यात दोन दुर्घटनांमध्ये तीन जणांचा बुडून दुदैर्वी मृत्यू झाला आहे. भांगसीमाता गड परिसरात दोघांचा, तर वेरुळ परिसरात एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रल्हाद चव्हाण, नितीन गुंडाळे आणि आर्यन सहानी अशी मृतांची नावे आहेत.
औरंगाबाद येथील भांगसीमाता गड परिसरात झालेल्या घटनेतील तरुणांना रस्त्यात लागलेल्या वाहत्या पाण्यात पोहण्याचा मोह झाला आणि त्यात त्यांनी पोहण्याचा निर्णय घेतला. पाण्याच्या प्रवाहाला वेग जास्त असल्याने या दोघांचाही मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत गारखेड्यातील तरुण मित्रांसोबत वेरूळच्या लेणी परिसरात गेला असताना तेथील कुंडात बुडून त्याचा मृत्यू झाला.