औरंगाबाद – औरंगाबाद येथील मुघल सम्राट औरंगजेबाची कबर नष्ट करण्याची मागणी मनसेच्या एका नेत्याने केल्याने या कबरीला आता पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.
हे ठिकाण भारतीय पुरातत्व विभागातर्फे संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. या कबरीला एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी नुकतीच भेट देऊन तेथे फुले वाहिली होती, त्यामुळे राजकीय वातावरण तापले होते.
मंगळवारी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी एका ट्विटमध्ये औरंगजेबाच्या थडग्याची महाराष्ट्रात काय गरज होती, असा प्रश्न उपस्थित केला आणि ती उद्वस्त केली पाहिजे जेणेकरून लोक तिथे जाणार नाहीत अशी टिप्पणी केली होती.या ट्विटनंतर, खुलताबाद परिसरातील काही लोकांनी, जिथे समाधी आहे, त्या संरचनेला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला.