पुणे – मुंबई- मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मन फकीरा’ हा चित्रपट व्हॅलेन्टाइन डेच्या दिवशी अर्थात ६ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. मृण्मयी देशपांडे या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असून नुकतेच निर्मात्यांनी या सिनेमाचे पहिले मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित होते. या चित्रपटात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
दरम्यान,मराठी चित्रपटाकडे प्रेक्षकांनी वळावे, यासाठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, सुव्रत जोशी, सायली संजीव यांनी डेक्कन परिसरातील गुडलक चौक येथे फलक झळकावत आवाहन केले. पर्पेल बुल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमटेड आणि स्मिता फिल्म प्रॉडक्शन्सच्या यांची प्रस्तुती असलेला ‘मन फकीरा’ या चित्रपटाची निर्मिती एस. एन. प्रॉडक्शन्स आणि स्मिता विनय गानु, नितीन प्रकाश वैद्य, ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार आणि किशोर पटेल यांनी केली असून चित्रपटाची सहनिर्मिती तृप्ती कुलकर्णी आणि प्रणव चतुर्वेदी याची आहे.
सिनेमाबद्दल सांगताना मृण्मयी देशपांडे म्हणते की, ‘मन फकिरा’ हा ट्रेंड सेटिंग चित्रपट असून तो नातेसंबंधांवर भाष्य करतो. आजची पिढी ज्या नातेसंबंधांकडे खुल्या नजरेने पाहते त्याच्याबद्दल हा सिनेमा बोलतो. आजची युवा पिढी विशेषतः लग्न या नात्याकडे फक्त बंधन म्हणून न पाहता त्याच्यापलीकडे जगायला शिकली आहे. मला वाटतं आजच्या पिढीसाठी लग्नाच्या व्याख्या बदलल्या आहेत ते एक बंधन न त्या आणखीन खुल्या आणि प्रगल्भ झाल्या आहेत.’
‘केवळ बंधन न वाटता या माणसाबरोबर आयुष्य काढता येणं शक्य आहे का, हा प्रश्न पहिल्यांदा सोडवून मग या गणितामध्ये उतरण्याचा विचार ही युवा पिढी करते. खऱ्या अर्थाने जोडीदार या शब्दाची व्याख्या किंवा समानार्थी शब्द शोधण्याचा प्रयत्न ते या नात्यात शोधत असतात. त्यांच्या मनाला पटेल असा निर्णय घेऊन ते या सीमा ओलांडतात.’