मुंबई-रिलायन्स जिओ कंपनीने क्वालक्वाम टेक्नो कंपनीबरोबर कमी खर्चात 5-जी स्मार्टफोन भारतीयांना उपलब्ध करण्यासाठी सहकार्य करार केला आहे. त्याचबरोबर दोन कंपन्यांनी संयुक्तपणे 5-जी तंत्रज्ञानाच्या यशस्वी चाचण्या केल्या असल्याचे वृत्त आहे.
या तंत्रज्ञान सहकार्यातून सुरुवातीला 5- जी स्मार्टफोन किमान 5 हजार रुपयात उपलब्ध करण्यात येतील. त्यानंतर मागणी वाढल्यावर या फोनच्या किमती अडीच हजार ते 3000 रुपयांपर्यंत कमी केल्या जातील असे जिओ कंपनीकडून सुचित करण्यात आले. भारतात सध्या 5- जी स्मार्टफोन 28 हजार रुपयापासून उपलब्ध होतात
चाचण्याबाबच्या माहितीनुसार रिलायन्स आणि कॉलकॉमच्या 5- जी तंत्रज्ञानातून 1 जीबीपीएस वेग उपलब्ध झाला आहे. या वेगाने 5- जी सेवा चाचण्या फक्त अमेरिका, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड आणि जर्मनीत करण्यात आल्या आहेत.
भारतामध्ये सध्या 5- जी सेवा उपलब्ध नाहीत. कारण सरकारने मोबाईल सेवा पुरवठादारांना आणखी 5- जी स्पेक्ट्रम उपलब्ध केलेले नाहीत. हे स्पेक्ट्रम लवकर उपलब्ध करावे अशी कंपन्यांनी मागणी केली आहे. म्हणजे त्यांना 5- जी तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेता येतील.
5- जी तंत्रज्ञान चीन आणि इतर काही विकसित देशाकडे आहे. त्याचबरोबर चीनकडून तंत्रज्ञान आयात करायचे की नाही, यामुळे सध्या मोठे वादंग चालू आहे. रिलायन्स जिओ कंपनीने 5- जी तंत्रज्ञान आयात करण्याऐवजी देशातच ते विकसित करण्यावर भर दिलेला आहे. आता रिलायन्स जिओ आणि क्वालक्वामच्याच्या चाचण्या यशस्वी झाल्यामुळे रिलायन्स जिओ 5- जी सेवा कधी सुरू करायच्या यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे.
भारतात अजूनही 30 कोटी लोक 2- जी फोन वापरतात. त्यांना महाग फोन घेणे परवडत नाही. या सर्व लोकांना 5- जी सेवा वापरता याव्या याकरिता रिलायन्सने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या अगोदर रिलायन्स जीओने 4- जी मोबाईल फोन दीड हजार रुपयाच्या ठेवीवर उपलब्ध केले होते.