चिपळूण : उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यांच्या चिपळूणमधील घरासमोर दगड, क्रिकेटचे स्टम्प आणि काचेच्या बाटल्या सापडल्यामुळे स्थानिक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर आता भाजप नेते नितेश राणे म्हणाले,’तुम्ही अशा पद्धतीने राणेंविरोधात बोलणार असाल तर कार्यकर्ते शांत बसणार नाहीत. महाराष्ट्रात राणेंना मानणारा एक वर्ग आहे. त्यांना आम्ही कुठपर्यंत शांत बसवणार, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.
नितेश राणे पुढे म्हणाले, ‘हल्ला नेमका कुणी केला हे शोधून काढणं आता पोलिसांचं काम आहे. पण अशा पद्धतीने बोलल्यावर प्रत्युत्तर मिळणारच…अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
नितेश राणे म्हणाले, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, नारायण राणेंना मानणारा वर्ग आहे. तुम्ही राजकीय वक्तव्य करायची असतील तर करा. पण खालच्या पातळीवरून बोलणार असाल तर कार्यकर्ते त्या त्या पद्धतीने रिअॅक्शन देणारच… कुणाकुणाला थांबवणार? असा सवाल राणेंनी केला.