नवी दिल्ली – देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियानातील कुटीर, लघू आणि मध्यम उद्योगांसाठीच्या उपाययोजनांची घोषणा केली. अर्थमंत्री एकूण ३ पत्रकार परिषदांद्वारे आत्मनिर्भर भारत अभियानातील उपाययोजनांची माहिती देणार असून आज या मालिकेतील दुसरी पत्रकार परिषद सुरु आहे. अर्थमंत्र्यांच्या या घोषणांचा ‘अर्थ’ सोप्या शब्दांमध्ये समजून घ्या डिजिटल प्रभातच्या या लाईव्ह ब्लॉगद्वारे.
- स्थलांतरित मजुरांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा होणार
- मजूर, शेतकरी आणि फेरीवाल्यांसाठीही आज आर्थिक पॅकेज
- गरीब कल्याण योजनेतून मजुरांना मदत
- महिनाभरात २५ लाख किसान क्रेडिट कार्ड वाटप
- ३ कोटी शेतकऱ्यांना वर्षभरात ४ लाख कोटींचा पुरवठा
- ३१ मेपर्यंत शेती कर्जाच्या व्याजावर सूट
- शहरी गरिबांसाठी ११ हजार कोटी
- बचत गटांमार्फत मास्क, सॅनिटायझरची निर्मिती
- मनरेगाच्या माध्यमातून प्रवासी मजुरांना मिळणार रोजगार
- महिलांनाही रात्री काम करण्याची मुभा; सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना
- सर्व मजुरांना नियुक्तीपत्र; वर्षातून एकदा आरोग्य तपासणी
- प्रवासी मजुरांना २ महिन्याचं धान्य
- रेशन कार्ड नसणाऱ्यांनाही ५ किलो गहू अथवा तांदूळ व १ किलो डाळ मिळणार
- मार्च २०२१ पर्यंत वन नेशन वन रेशन कार्ड योजना १००% राबवणार
- या योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना देशात कोठेही रेशनचे धान्य मिळणार
- सरकार कमी भाड्याची घर पुरवणार; मजूर, शहरी गरिबांना लाभ
- मुद्रा योजनेतून ५० हजारापर्यंत कर्ज घेतलेल्यांना व्याजात २ टक्क्यांची सूट
- ५० लाख फेरीवाल्यांसाठी ५ हजार कोटींचे पॅकेज
- मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा