भोर – मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपले आहे. परिसरातील ओढे-नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. सायंकाळी अचानक मुसळधार पाऊस आल्यामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या लोकांची तारांबळ उडाली.
परतीच्या पावसामुळे भात पिकाला फायदा होत आहे. पोटरीत आलेले भाताचे पीक बहरणार आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज आहे. खरीपातील कडधान्य पिकाला फटका बसला असून, काढणीस आलेली पिके वाया जाण्याच्या भीती आहे. परतीच्या पावसामुळे भात, वरी, नाचणीला पोषक वातावरण मिळाले आहे.