नवी दिल्ली – आज सकाळपासूनच प्रजासत्ताकदिनानिमित्ताने देशभरातील विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु असून देशभरामध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. अशातच आजच्या ७१व्या प्रजासत्ताकदिनी सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी रेंजर्ससोबत मिठाईची देवाणघेवाण करण्याची प्रथा यंदा खंडित केली आहे.
याबाबत प्रसिद्ध वृत्तसंस्था एएनआयने वृत्त दिले असून पंजाब येथे वसलेल्या अटारी-वाघा बॉर्डर येथे प्रजासत्ताकदिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘बिटिंग रिट्रीट सेरेमनी’साठी भारतीय नागरिकांनी मोठ्या संख्येमध्ये हजेरी लावली होती. ‘बिटिंग रिट्रीट सेरेमनी’साठी उपस्थित असलेल्या नागरिकांनी, भारत माता की जय! वंदे मातरम! अशा घोषणा देत सीमा सुरक्षा दलाच्या जवानांचे मनोबल वाढवले.
दरम्यान, ‘बिटिंग रिट्रीट सेरेमनी’ नंतर भारतीय सीमा सुरक्षा दल व पाकिस्तानी रेंजर्स यांच्यादरम्यान असलेली मिठाई देवाणघेवाण करण्याची प्रथा यंदा खंडित करण्यात आली. यंदा सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी रेंजर्ससोबत मिठाई वाटपाचा कार्यक्रम वगळला.
On 71st #RepublicDay today, Border Security Force (BSF) did not exchange sweets with Pakistani Rangers at Attari border. pic.twitter.com/2lO2JiXsT0
— ANI (@ANI) January 26, 2020