Assembly Elections 2024 | Amol Kolhe: नुकतंच झालेल्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला उशीर का? प्रश्नाचे उत्तर खुद्द निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले. तर सणांची यादी वाचत काही कामं कशी राहिली आहेत, यावर देखील त्यांनी भाष्य केले.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपत आहे, निवडणूक का जाहीर केली जात नाही, असं राजीव कुमार यांना विचारण्यात आले. यावर ते म्हणाले, महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक सोबत झाली होती.
हरियाणाची मुदत 3 नोव्हेंबर होती तर महाराष्ट्राची 26 नोव्हेंबर आहे. त्यावेळी जम्मू काश्मीरचा मुद्दा नव्हता. यावेळी पाच निवडणुकांचा मुद्दा आहे. महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंड आणि दिल्लीची निवडणूक आहे.
सुरक्षा बलांचा मुद्दा आहे. महाराष्ट्रात पाऊस झाला होता त्यामुळं बीएलओची काम देखील झालेली नाहीत. अनेक सण आहेत, गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्री, दिवाळी आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन दोन राज्यांच्या निवडणुका सोबत घेण्याचा निर्णय घेतला, असेही ते म्हणाले.
दरम्यान, यावर आता महाराष्ट्रातील अनेक राजीय नेते भाष्य करताना दिसत आहे. अश्यातच आता शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यावर प्रतिक्रिया देत केंद्रसरकारवर हल्लाबोल केला आहे.
“शरद पवार”
या एका नावाची एवढी भीती ?तुम्ही निमंत्रण पत्रिकेतून पवार साहेबांचं नाव हटवू शकाल, मात्र महाराष्ट्रातील जनतेच्या मनात असलेलं साहेबांचं नाव कधीही मिटवू शकणार नाही !@NCPspeaks @PawarSpeaks@TV9Marathi @SakalMediaNews @abpmajhatv @mataonline @SaamanaOnline… pic.twitter.com/GezE7dIABw
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) August 16, 2024
‘महाराष्ट्रातल्या जनतेने या सरकारला नापास केलं आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी दिल्लीतल्या पिताश्रींना सांगून महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक पुढे ढकलली आहे’ अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली आहे. गेल्या पंधरा वर्षांत पहिल्यांदाच महाराष्ट्र आणि हरियाणा यांची निवडणूक एकत्र होणार नाही हे घडतंय असंही अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे.
शरद पवार गटाचे ‘शिवस्वराज्या’ यात्रा आज गंगाखेडमध्ये पोहचली आहे. या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सभेत अमोल कोल्हेंनी सरकारविरोधात टोलेबाजी केली. तसंच निवडणूक जिंकण्याची धास्ती असल्यानेच ती पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप केला आहे.
यावेळी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, ‘जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा आवश्यकतांमुळे महाराष्ट्रातील निवडणुका नंतर जाहीर केल्या जातील”, असं राजीव कुमार यांनी म्हटलंय. “महाराष्ट्रात पाऊस आहे. अनेक सण उत्सव आहे. गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्री, दिवाळी हे सण आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत इथंही निवडणुका होतील”, असंही ते म्हणाले.
राज्यातील महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्या निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागल्या असून आधी जागावाटप व नंतर उमेदवार निश्चिती अशी प्रक्रियाही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे लोकसभा निवडणुकांच्या निकालांची अद्याप चर्चा होत असताना विधानसभा निवडणुका मात्र लांबणीवर पडल्या आहेत’. असं कोल्हे म्हणाले.
अमोल कोल्हे पुढे म्हणाले, ‘एकदा एका कॉलेज मालकाचं पोरगं होतं. त्याचा परीक्षेचा नीट अभ्यासच झाला नव्हता. त्या पोराला दररोज वाटायचं की मी परीक्षेत नापास होईल. त्याने बरेच प्रयत्न केले, गाईड आणलं, कॉपी करायची सवय केली, तरीही पोराला खात्री पटलीच नाही की आपण पास होऊ.
मग तो त्याने बापाला जाऊन सांगितलं परीक्षा थोडी पुढे ढकला. बापाने विचारलं कशाला पुढे ढकलायची परीक्षा? नियमानुसार परीक्षा झाली पाहिजे. त्यावर तो पोरगा म्हणाला माझा अभ्यासच झाला नाही. तुम्हाला कळलं असेल ना पोरगं कोण ते? असा टोला अमोल कोल्हेंनी लगावला.