दुबई – आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत बलाढ्य भारतीय संघाशी दोन हात करण्याची संधी नवख्या हॉंगकॉंग संघाला मिळाली आहे. या दोन संघात होत असलेला सामना भारतीय संघासाठी प्लेऑफमधील प्रवेशाची औपचारिकता ठरेल तर हॉंगकॉंगसाठी अनुभवी देणारा ठरणार आहे.
भारतीय फलंदाजीबाबत काही प्रश्न पाकिस्तानवरील विजयानंतरही निर्माण झाले असून प्रमुख फलंदाजांना जबाबदारीने खेळावे लागणार आहे. हा सामना त्यांच्यासाठी सोपा समजला जात असला तरीही हॉंगकॉंगला कमी लेखून चालणार नाही. एकेकाळी नवख्या बांगलादेशनेही भारतीय संघाला 2007 सालच्या एकदिवसी सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतून बाहेर काढले होते. त्यामुळे या सामन्यात पूर्ण वर्चस्व राखत प्लेऑफमध्ये पात्र होण्याची भारतीय संघाला नामी संधी आहे.
भारत विरूध्द हॉंगकॉंग या सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार असून तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा(टाॅस) कौल हा हॉंगकॉंगच्या बाजूने लागला आहे. कर्णधार निजाकत खान याने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.
Toss Update: Hong Kong have won the toss and they have opted to bowl first against #TeamIndia https://t.co/9txNRez6hL… #INDvHK #AsiaCup2022 pic.twitter.com/VpFooHagSa
— BCCI (@BCCI) August 31, 2022
संघात बदलाची अपेक्षा
पाकिस्तानवरील विजयानंतर आता हॉंगकॉंगशी होत असलेला सामना तुलनेने सोपा असल्यामुळे भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला तर सूर्यकुमार यादवच्या जागी दीपक हुडाला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच यजुवेंद्र चहलच्या जागी रवीचंद्रन अश्विन किंवा रवी बिष्णोईला संधी मिळण्याचेही संकेत मिळत आहेत.