मुंबई : न्यायालयाच्या आदेशानुसार मेट्रो कारशेडसाठी गोरगाव येथील आरे जंगलातील दोन हजारांहून अधिक झाडांची कत्तल करण्याचे निर्देश देणाछया सनदी अधिकारी व मुंबई मेट्रो रेल्वे कार्पोरेशनच्या व्यवस्थापकिय संचालिका अश्विनी भिडे यांना प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे.
बढती देताना मेट्रो-3 चे संचालकपदही अश्विनी भिडे यांच्याकडे कायम ठेवण्यात आले आहे. भिडे यांच्याबरोबरच आणखी तीन सनदी अधिकाछयांना बढती देण्यात आली आहे. भिडे यांना बढती दिल्याबद्दल पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मेट्रो कारशेडसाठी मुंबईतील आरे वसाहतीमधील वृक्षतोडीवरुन वाद झाल्यानंतर मेट्रो-3 च्या संचालक असलेल्या अश्विनी भिडे यांच्यावर शिवसेनेने टीका केली होती. पर्यावरणवादी आणि तिथल्या स्थानिकांनीही कारशेडला विरोध केला होता. याचदरम्यान शिवसेना स्थानिकांच्या आणि पर्यावरणवाद्यांच्या बाजूने उभी राहिली.
तर अश्विनी भिडे कारशेड आरे वसाहतीमध्ये बांधण्यावर ठाम होत्या. त्यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी अश्विनी भिडेंवर टीकादेखील केली होती. अश्विनी भिडे यांना हटवून सक्षम अधिकाछयाला जबाबदारी द्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. परंतु ही मागणी पूर्ण झाली नव्हती.
मात्र, आता शिवसेनेची राज्यात सत्ता येऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत, तर आदित्य ठाकरेदेखील कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार भिडेंची बदली करतील, असा अंदाज अनेक जण वर्तवत होते. परंतु आता भिडे यांना थेट बढती देत मेट्रो-3 च्या व्यवस्थापकीय संचालकपदी ठेवले आहे.
दरम्यान, कुलाबा-वांद्रे-सीप्झ दरम्यानच्या मेट्रो 3 प्रकल्पाचे काम सध्या जोमाने सुरु असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रोच्या कारशेडला स्थगिती दिली आहे. भिडे यांच्यासह आणखी तीन सनदी अधिकाछयांना बढती देण्यात आली आहे. यामध्ये वस्त्रोद्योग विभागाचे सचिव के. एच. गोविंदराज, आंतरराज्य प्रतिनियुक्तीवर आंध्र प्रदेशात कार्यरत असलेल्या राधिका रस्तोगी आणि नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले विकास रस्तोगी यांचा यामध्ये समावेश आहे.
विशेष म्हणजे या अधिकाछयांना बढती मिळाली असली ते सध्या कार्यरत असलेल्या ठिकानीच कार्यरत राहणार आहेत. बढती मिळालेले हे सर्व अधिकारी 1995 च्या तुकडीतील सनदी अधिकारी आहेत.