शिरूर येथील कार्यक्रमात आमदार अशोक पवार यांचे प्रतिपादन
शिरूर – समाजाला महंमद पैगंबर यांनी देश प्रेम, एकमेकांना मदत करणे, सुखदुःखात मदत करणे या त्यांच्या विचारांची गरज आज समाजाला आहे. यामुळे समाजात एकोपा व एकमेकांना मदत करण्याची वृती वाढेल असे मत शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले.
शिरूर येथे ईद ए मीलादुन्नबी (पैगंबर जयंती) निमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार अशोक पवार बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष वैशाली वाखारे, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, बाजार समिती सभापती शशिकांत दसगुडे, माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, मुजफ्फर कुरेशी, उपाध्यक्ष नसीम खान, सचिव सिकंदर मण्यार, महंमद पटेल, फिरोज बागवान, मुश्ताक शेख, नगरसेविका रोहिणी बनकर, पूजा जाधव, सचिन जाधव, मच्छिंद्र परदेशी, हुसेन शाह, हाफिज बागवान कलींम सय्यद, अस्लम सय्यद मोलाना अश्रफ काझी व मोठ्या संख्येने मुस्लिम नागरिक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना मौलाना कैसर यांनी महंमद पैगंबर यांची शिकवण त्यांचे विचार आईचे महत्व, समाजाचे एकोपा याविषयी माहिती सांगितली. यावेळी शिरूर शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. ख्वाजा गरीब नवाज दर्गा अजमेर व मक्का टॉवर यांचे देखावे नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. शहरात मिरवणुकीत सहभागी मुलांना ठिकठिकाणी खाऊचे वाटप करण्यात आले. स्वागत महंमद पटेल यांनी केले. नसीम खान यांनी आभार मानले.