गेहलोत सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला
नवी दिल्ली – राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. त्यामुळे तूर्तास तरी राजस्थानमधील राजकीय पेचप्रसंगाचा सामना टळलेला आहे.
अशोक गेहलोत सरकारने विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान विधानसभा अधिवेशन २१ ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.
राजस्थानचे कायदे आणि संसदीय कार्य मंत्री शांति कुमार धारीवाल यांनी आज विशेष अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर राज्य विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. विश्वासदर्शक ठरावावर आवाजी मतदान झाले. यामध्ये गेहलोत सरकारने बहुमत सिद्ध केले.