मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. अशोक चव्हाण हेच विश्व हिंदू परिषदेचे प्रतिनिधी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशोक चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाजपने उभे केल्याचे म्हटले होते. त्याला आज प्रकाश आंबेडकरांनी प्रतिउत्तर दिले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, काँग्रेस आणि भाजप जवळचे आहेत. हे चोराच्या उलट्या बोंबा मारत आहेत. यांची दांगडशाही संपवण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत. तसेच निकालानंतर राज्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.