नवी दिल्ली – मानहानीच्या एका प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. लोकसभा सचिवालयाने त्याची अधिसूचना जारी केली आहे. या निर्णयानंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेऊन अधिवेशन सुरु असताना सभात्याग केला. तसेच काँग्रेस नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. देशभरात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर विविध नेते प्रतिक्रिया देत आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी देखील या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिलीआहे. त्यांनी म्हटले आहे की, “राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून केंद्र सरकारने राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर नेले आहे. या देशात कोणी जनतेचा आवाज उचलू नये, आपल्याविरूद्ध बोलू नये, असाच त्यांचा डाव आहे.
हा सारा प्रकार संतापजनक असून, लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या या निर्णयाचा मी तीव्र निषेध करतो” असं देखील अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
Rahul Gandhi disqualified : गरज पडली तर लोकशाही वाचवण्यासाठी तुरुंगातही जाऊ – मल्लिकार्जुन खर्गे
दरम्यान, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आलीय. काल सूरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांनी 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आज लोकसभेने राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द केलंय. काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का आहे. लोकसभा सचिवालयानं कायद्यानुसार राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द केलंय. भविष्यात जर राहुल यांची शिक्षा कमी झाली तरच त्यांना खासदारकी पुन्हा बहाल करण्यात येईल.