मुंबई – शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात सुरु झालेला संघर्ष सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. शिवसेना कोणाची ? आमदारांच्या निलंबनाबाबत काय होणार याबाबत न्यायालयात १२ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी भाजप नेते आशिष शेलार यांनी अंतर्गत द्वंद्वामध्ये शिवसेना फुटली असल्याचे सूचक विधान केलं आहे. पत्रकरांशी संवाद साधताना शेलार यांनी शिवसेनेतील फुटीबाबत भाष्य केलं.
यावेळी शेलारांना शिवसेनेच्या धनुष्यबान चिन्हाबाबत विचारले असता ते म्हणाले,”महाराष्ट्राच्या जनतेसमोर शिंदेनी भूमिका मांडली आहे. विचाराने आचरणे आणि संविधानाने शिवसेना पक्ष ते चालवताहेत असा दावा त्यांनी इलेक्शन कमिशनसमोर केला आहे त्यामुळे जो बाळासाहेबांचा विचार घेऊन जाणारा पक्ष असेल त्यालाच धनुष्यबाण मिळाला पाहिजे असं मत त्यांनी मांडलय आणि ते मत योग्य आहे असं आमचं म्हणणं आहे असे शेलार यावेळी म्हणाले.
आमच्यासोबत शिवसेना राहिली असती तर शिवसेनेत हे द्वंद्व झालं नसत. ते फुटले नसते असंही शेलार यावेळी म्हणाले. ही वैचारिक लढाई आहे. उठाव आहे. म्हणून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये बाळासाहेबांचा हिंदुत्ववादी विचार तगला पाहिजे, राहिला पाहिजे, वाढला पाहिजे ही भूमिका का घ्यायला लागली याच आत्मचिंतन उद्धवजीनी केलं पाहिजे. असही शेलार यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हंटले.