मुंबई : एमआयएम भायखळ्याचे माजी आमदार वारीस पठाण यांनी अखेर पत्रकार परिषद घेऊन माफी मागितली. आम्ही 15 कोटी 100 कोटींना भारी आहोत, असं बेताल वक्तव्य त्यांनी कर्नाटकातील गुलबर्गा इथे जाहीर सभेत बोलताना केले होते.
त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. तसेच त्यांनी या वक्तव्यावर माफी मागण्यास नकार दिला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. मी हिंदूंविरोधी आहे असे म्हणणे चुकीचं आहे.
मी कोणत्याही धर्मविरोधात बोललो नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो. मला आणि माझ्या पक्षाला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचे वारिस पठाण म्हणाले.
AIMIM leader Waris Pathan on his '15 crore hain magar 100 ke upar bhaari hain' remark: My statement is being twisted to target and defame me and my party due to a political conspiracy. However, I take back my words if they hurt anyone and apologise for the same. pic.twitter.com/KtTNeDlw2f
— ANI (@ANI) February 22, 2020
दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वारिस पठाण याना अटक काण्याची मागणी केली होती. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वारिस पठाण यांचे मत चुकीचे असल्याचे म्हंटले होते.