मुंबई: लॉकडाउनच्या काळात राज्यातील मद्यविक्री बंद करण्यात आली आहे . या कालावधीत अवैध मध्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग धडक कार्यवाही करीत आहे.
या लाकडाऊनच्या काळात 3 एप्रिलपर्यंत राज्यात एकूण 1221 गुन्हे नोंदकरण्यात आली आहे.तसेच 2 कोटी, 82 लाख,31,हजार 102 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात 36 वाहने जप्त केली असून 472 आरोपींना अटक करण्यात आले आहे.