भारतात 2018मध्ये 70 गुन्ह्यांची नोंद
नवी दिल्ली : देशामध्ये 2018 मध्ये देशद्रोहाचे 70 गुन्हे नोंदवले गेले. 2017 मध्ये 51 तर 2016मध्ये 35 गुन्हे नोंदवले असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यरोच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
देशद्रोहाचे सर्वाधिक गुन्हे झारखंडमध्ये नोंदवले गेले. तेथे 18 गुन्ह्यांची नोंद झाली.त्या पाठोपाठ आसाम (17) आणि जम्मू काश्मिरचा (12) क्रमांक लागतो. 2017 मध्ये जम्मू काश्मिरमध्ये आश्चर्यकारकरित्या देशद्रोहाचा एकच गुन्हा नोंदवला गेला होता.
देशद्रोहाचा गुन्हा नोंदवलेल्या एकूण गुन्ह्यांपैकी निम्मे गुन्हे देशाविरूध्द गुन्हा या कलमाखाली नोंदवण्यात आले आहेत. मात्र अन्य कलमांखाली याबाबत नोंदवलेल्या गुन्ह्यात घट झालेली आहे. बेकायदा कारवाया प्रतिबंधात्मक कायदा (युएपीए) आणि सरकारी गोपनियता कायद्याखाली (ओएसए)नोंदवलेल्या गुन्ह्यातही 2018 मध्ये वाढ झाली आहे.
युएपीएखाली एक हजार 182 गुन्हे 2018 मध्ये नोंदवले गेले. 2017मध्ये ही संख्या 901 इतकी होती. तर ओएसएखाली नोंदवलेल्या गुन्ह्यांची संख्या 2017 च्या 18 गुन्ह्यांच्या तुलनेत 2018मध्ये 40 इतकी वाढली.