भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना अहमदबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतातील सर्वात जास्त प्रेक्षक क्षमता असलेले हे मैदान पहिल्याच दिवशी जवळपास 100 टक्के भरलेले होते. टी-20 क्रिकेटच्या लोकप्रियतेमुळे कसोटी क्रिकेटकडे वळण्याची इच्छा नसलेल्या प्रेक्षकांनाही कसोटी सामना पाहण्यासाठी मैदानावर आणण्यात यश मिळाले ही कसोटी क्रिकेटसाठी सकारात्मक बाब ठरली.
2000 सालापूर्वीचे कसोटी सामने पाहिले तर असे लक्षात येते की त्यावेळी मैदानात बसण्यासाठी एक जागाही मिळत नव्हती. गेल्या वर्षात असे चित्र दिसत होते की मैदानावर तूम्हाला चॉइस मिळू लागला कारण गर्दीच होत नव्हती. मागे एकदा एक सोकॉल्ड समालोचक म्हणाले होते की सामन्यांचे निकाल लागले नाहीत तर लोक कसोटी सामने पाहण्यासाठी का येतील. जर वयाची सत्तरी पार केलेले हे समिक्षक कम समालोचकच असे म्हणत असतील तर मग आपण काय बोलणार. प्रयत्न करण्याच्या आधीच ही निराशा संतापजनक आहे.
1877 सालापासून कसोटी क्रिकेट सुरू झाले. त्यावेळी आतासारख्या सुविधा नव्हत्या तरीही खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी मैदाने ओसंडून वाहात होती. आता महिलांच्या आयपीएल स्पर्धेतही असेच चित्र दिसत आहे की प्रेक्षकच पाठ फिरवत आहेत मग या स्पर्धा आणखी कीती काळ सुरु राहतील. आपल्याकडे सध्या टी-20 हे एकच चलनी नाणे बनले आहे. सामना छोट्या शहरांत असो किंवा मेट्रो शहरात टी-20 सामने तसेच आयपीएलचे सामने पाहण्यासाठी तोबा गर्दी असते. मात्र, अहमदाबादेतील चौथा कसोटी सामना पाहण्यासाठी तब्बल 1 लाख प्रेक्षक उपस्थित होते.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चुरस पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानइतकी नसली तरीही त्याच्या जवळ जाणारी निश्चितच आहे. इंग्लंड व ऑस्ट्रेलियातील कसोटी सामन्यांसाठी तुफान गर्दी असते हे चित्र अहमदाहादच्या रुपाने भारतातही दिसले ही अभिनामाची गोष्ट आहे. 2013 सालच्या इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस कसोटी मालिकेतील सामना पाहण्यासाठी मेलबर्नवर 91 हजार प्रेक्षक उपस्थित होते. हा आजवरच्या उपस्थितीचा विक्रम होता तोच अहमदाबादमध्ये मोडला गेला.
#INDvAUS 4th Test Day 2 Stumps : ख्वाजाची दीडशतकी तर ग्रीनची शतकी खेळी; दुसरा दिवसही ऑस्ट्रेलियाचाच…
हा चौथा सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान थॉमस अल्बानीस उपस्थित होते, त्यामुळेही सामना पाहण्याबरोबरच प्रेक्षकांमध्ये घोषणांची मोदी लाटही पुन्हा एकदा दिसून आली. आता येत्या काळात अहमदाबादचाच आदर्श घेत भारतातच नव्हे तर जगभरातील मैदानांवर कसोटी सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची अशीच तोबा उपस्थिती असावी हीच अपेक्षा आहे, तरच कसोटी क्रिकेटची लोकप्रीयता टीकेल व वाढेलही.