नवी दिल्ली : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने पूर्णपणे हाहाकार माजवला होता. त्यात शेकडो लोकांचे बळी गेल्याचे पाहायला मिळाले. त्यात कोणाचा मुलगा गेला तर कोणाचे वडील, कोणाचा भाऊ, कोणाची बहीण, कोणाची आई गेली. एकूणच करोनाने प्रत्येकाच्या पदरी न भरून येणारे दुःख आले. दरम्यान, देशभरात तब्बल १ लाख बालकांचा आपल्या आई-वडिलांच्या मायेचा आधार कायमचा गमावला आहे.
यंदाच्या एप्रिल महिन्यात लहान मुलांच्या अनाथ होण्याचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत साडेआठ पटींनी अधिक आहे. करोनामुळे देशभरात यंदाच्या वर्षी १ लाख १९ हजार लहानग्यांचे पालनकर्ते (पालक किंवा आजी-आजोबा) दगावले.
१ मार्च २०२० ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत ११,३४,००० पालकांचा मृत्यू झाला. १०,४२,०००
मुलांच्या आई किंवा वडील यापैकी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
भारतात १,१६,००० मुलांचे आई किंवा वडील कोरोनाने हिरावून नेले. २५,५०० मुलांची आई दगावली. ९०,७५१ मुलांचे वडील दगावले. १२ मुलांचे आई-वडील दोन्ही दगावले