मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज(शनिवार) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सकल मराठा समजातर्फे ठाण्यामध्ये आयोजित कार्यक्रमात केलं.
यावेळी ते म्हणाले,’जोपर्यंत आमच्या रक्तात छत्रपती आहेत आम्हाला कोणी गुलाम करू शकत नाही. जोपर्यंत आमच्या विचारात छत्रपती आहेत, तोपर्यंत आमचे विचार कोणी थांबवू शकत नाही. जोपर्यंत आमच्या कृतीमध्ये छत्रपतींचं समर्पण आहे, तोपर्यंत आम्ही अन्याय करू शकत नाही.’
ते पुढे म्हणाले,’ही भव्य मिरवणूक आमच्या राजाची भव्यता सांगते आणि त्यासोबतच आमचा भगवा हा आम्हाला आठवण करून देतो त्यागाची. की ज्या त्यागातून स्वराज्याची निर्मिती ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. आपल्या सर्वांना माहिती आहे की तो काळ असा होता, की जेव्हा देशातील अनेक राजे आणि अनेक राजवाडे हे मुगलांचं मनसबदार म्हणून घेण्यामध्ये देखील धन्यता मानत होते.’ असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले.
पहा विडिओ
Heartiest greetings to all on the auspicious occasion of ShivJayanti !
समस्त विश्वातील शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!https://t.co/4agVIhmrXv#ChhatrapatiShivajiJayanti #ChhatrapatiShivajiMaharaj #शिवजयंती pic.twitter.com/eQdk2qqC5U— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 19, 2022