मुंबई – शिवसेनेशी बिनसल्याने महाराष्ट्राच्या सत्तास्पर्धेतून भाजप रविवारी बाहेर पडला. त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. त्यामुळे आता चेंडू शिवसेनेच्या कोर्टात गेला आहे. तसेच, भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिवसेनेला आज सायंकाळी 7.30 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मात्र, शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची मदत घ्यावी लागणार आहे. अरविंद सावंत यांच्या रूपाने केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेचा एक मंत्री आहे. सावंत यांना राजीनामा द्यावा लागेल, असे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले होते. यानुसार अरविंद सावंत यांनी एक ट्विट करत केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Union Minister of Heavy Industries and Public Enterprises & Shiv Sena MP Arvind Sawant: I am resigning from my ministerial post. pic.twitter.com/6UVYpXK6Sa
— ANI (@ANI) November 11, 2019
अरविंद सावंत म्हणाले कि, लोकसभा निवडणुकी आधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता.आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभीमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे. या संदर्भात आज सकाळी ११.०० वा. दिल्ली येथे मी पत्रकार परिषद घेणार आहे, असे ट्विट त्यांनी केले.
शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे?
आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे. या संदर्भात आज सकाळी ११.०० वा. दिल्ली येथे मी पत्रकार परिषद (Press Conference) घेणार आहे.— Arvind Sawant (@AGSawant) November 11, 2019
दरम्यान, राज्यात नवी राजकीय समीकरणे उदयास येण्याची चिन्हे आहेत. आता सगळे लक्ष शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष काय भूमिका घेतात याकडे लागले आहे. त्यांच्यात समझोता न झाल्यास राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने होऊ शकते.