नवी दिल्ली – आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल आज नवी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी रामलिला मैदानावर झालेल्या समारंभात केजरीवाल आणि त्यांच्या मत्रिमंडळाला पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
गेल्या मंत्रीमंडळात सहभागी असलेल्या सर्वच मंत्र्यांना ह्या नवीन मंत्रीमंडळात समाविष्ट करण्यात आले आहे. यात मनिष सिसोदिया, सत्येंदर जैन, गोपाल राय, कैलाश गलहोत, इम्रान हुसैन आणि राजेंद्र पाल गौतम यांनीहे मंत्रीपदाची शपथ घेतली.
गोपाल राय हे पूर्वीच्या सरकारमध्ये कामगार मंत्री होते. त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये शहिद झालेल्यांच्या नावाने शपथ घेतली. गौतम यांच्याकडे सामाज कल्याण खात्याची जबाबदारी होती. त्यांनी भगवान गौतम बुद्धांच्या नावे शपथ घेतली. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने 62 जागा जिंकून विधानसभेच्या निवडणूकीत निर्विवाद विजय मिळवला. केजरीवाल यांनी सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.