नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी जिंकत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी ते म्हणाले की, मी कोणत्याही किंमतीत दिल्ली सोडणार नाही. निवडणूकीमध्ये विजय झाला नाही झाला तरी संपूर्ण पंजाब आमचा आहे. असेही ते म्हणाले आहेत.
एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, ”पंजाबमध्ये आम्ही आमचे सरकार बनवू शकलो नाही. पण पंजाब अजूनही आमचाच आहे. आम्ही आमचे सरकार बनवू शकलो नाही, पण पंजाबचे लोक आमच्यावर खूप प्रेम करतात. तुम्ही कुठूनही राजकारण सुरू करा, संपूर्ण देश आमचा आहे. आपण संपूर्ण देशाचा विचार केला पाहिजे”
पंजाबमध्ये मोफत शिक्षणाची घोषणा
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आल्यास राज्यात जन्मलेल्या लोकांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय जर येथे आपचे सरकार स्थापन झाले तर कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या सैनिक किंवा पोलिस कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांचा सानुग्रह अनुदान देईल. अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री केरजीवाल यांनी केली आहे.