गुजरात विधानसभा निवणुकीचे आज निकाल जाहीर झाले. या निवडणुकीमध्ये भाजपने १५० पेक्षा जास्त जागा मिळवत इतिहास रचला आहे. तर दुसरीकडे २०१७ च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. आम आदमी पक्षाने दिल्ली आणि नंतर पंजाबमध्ये सरकार स्थापन केल्याने गुजरातेत ते कमल करतील असे वाटत होते, मात्र गुजरातच्या जनतेने अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ला नाकारले. मात्र ‘आप’साठी या निवडणुकीमध्ये एक मोठी साकारात्मक बाब घडली आहे. त्यामुळे गुजरात निवडणुकीचा निकाल आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी गुजरातच्या जनतेचे आभार मानले आहेत.
“राष्ट्रीय अध्यक्षांच्या स्वतःच्याच राज्यात भाजप पराभूत”, काँग्रेसने घडवला सत्ताबदल!
“गुजरात विधानसभेचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालानंतर गुजरातच्या जनतेने आम आमदी पक्ष आज राष्ट्रीय पक्ष बनवले आहे. आपला गुजरातमध्ये ज्या प्रमाणात मत मिळाले आहे, त्यानुसार आप हा कायदेशीर राष्ट्रीय पक्ष बनला आहे. ही मोठी गोष्ट आहे. आज देशात बोटावर मोजण्याइतके राष्ट्रीय पक्ष आहेत. आता आपचाही त्यात समावेश झाला आहे. दहा वर्षांपूर्वी आम आदमी पक्षाचा जन्म झाला होता. आज त्या पक्षाचे दोन राज्यात सरकार आहे आणि आज तो पक्ष राष्ट्रीय पक्ष बनला आहे. आज अनेक जणांना या गोष्टीचं आर्श्चय वाटते आहे”,असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
“राष्ट्रीय अध्यक्षांच्या स्वतःच्याच राज्यात भाजप पराभूत”, काँग्रेसने घडवला सत्ताबदल!
“मी गुजरातच्या जनतेचे मनापासून आभार मानतो. कारण निवडणुकीच्या काळात गुजरातमध्ये आल्यानंतर तेथील जनतेने भरपूर प्रेम दिले आहे, त्यामुळे त्यांच्या या प्रेमाबद्दल मी आयुष्यभर ऋणी राहील. गुजरातला भाजपचा गड मानले जाते, मात्र त्याच गडाला खिंडार पाडण्यात आम्ही यशस्वी झालो आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच गुजरातच्या १३ टक्के जनतेने आपवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे मी गुजरातच्या जनतेचे आभार मानतो. पुढील वेळी आमचा हा पक्ष नक्कीच निवडून येईल”, असेही केजरीवाल यांनी यावेळी म्हटले आहे.
राष्ट्रीय पार्टी बनने पर आम आदमी पार्टी के सभी कार्यकर्ताओं और सभी देशवासियों को बधाई। pic.twitter.com/sba9Q1sz1f
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 8, 2022
“मागील ७५ वर्षांत देशात फक्त शिवीगाळ आणि जातीपातीच राजकारण केलं जात आहे. त्यामुळे आता देशात आप हा एकमेव पक्ष आहे, जो देशात केवळ विकासाचे राजकारण करतो. आम्हाला सकारात्मक राजकारण करायचे आहे. हीच ओळख आम्हाला कायम ठेवायची आहे. आम्ही दिल्लीत आणि पंजाबमध्ये केलेल्या कामाच्या बळावरच गुजरातमध्ये निवडणूक लढवली. त्यामुळे आम्ही गुजरातमध्ये कोणालाही शिवीगाळ केली नाही”, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.