मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर सत्तेची समीकरणं सतत बदलत आहेत. एकनाथ शिंदे यांनी आज बंडखोर आमदारांना घेऊन कामाख्या देवीचं दर्शन घेतलं त्यानंतर ते गोव्याला जाणार असल्याची माहिती आहे. कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना हीच आमची खरी शिवसेना असल्याचं म्हंटलं आहे.
बहुमत आमच्याकडेच
पुढे बोलताना शिंदे म्हणाले , ‘कामाख्या देवीचं दृष्टीनं घेतलं आहे. वेगळाच आनंद आणि समाधान मिळालं आहे. कोणत्याच आमदाराला जबरदस्तीने आणलं नाही. सर्व आनंदात आहेत , असे माध्यमांसमोर सांगितलं. उद्या आम्ही मुंबईत पोहचू आमच्याकडे ५० आमदार आहेत. दोन तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्हाला कोणत्याही फ्लोअर टेस्टची चिंता नाही. जिया काही प्रक्रिया होईल त्यात आम्ही नक्कीच पस होऊ…
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार
ते पुढे बोलताना म्हणाले , आम्हाला कुणी थांबवू शकता नाही कारण लोकशाहीत नंबर आणि बहुमताला महत्व असते. या देशात संविधान , नियम यापुढे कुणीही जाऊ शकत नाही. बहुमत चाचणीनंतर . बहुमत चाचणीनंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार. छत्रपती शिवाजी महाराजांनापण वंदन करणार. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनादेखील आम्ही वंदन करणार. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. ही हिंदुत्वाला सामोरे नेणारी शिनसेना आहे. महाराष्ट्र हे जनतेच राज्य सुजलाम सुफलाम करण्यासाठी, या महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना आम्ही पुढं घेऊन जातोय. असे शिंदे म्हणाले.
राजकारणाची नवी सुरवात
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, आसाम मध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं शिंदे गटाचे आमदार खबरदारीचा इशारा म्हणून गोव्याच्या दिशेनं रवाना होणार आहेत. कामाख्या देवीचं दर्शन झाल्यानंतर बंडखोर आमदार गुवाहाटीच्या दिशेनं परतणार आहेत. त्यानंतर गोव्याच्या दिशेने रवाना होतील. राजकारणाची नवी सुरवात म्हणून शिंदे यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतल्याचे म्हंटले. बहुमत चाचणीपर्यंत शिवसेना नेत्यांपासून दूर ठेवण्यासाठी मोठी खबरदारी घेतली जातेय.