मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केल्यानंतर राज्य सरकार विरुद्ध भाजप असे दोन गट पडल्याचे चित्र आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गोस्वामींना बेड्या ठोकल्यानंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. त्यामुळे या प्रकरणावरून महाराष्ट्र सरकार विरुद्ध भाजप अशी जुंपली आहे.
अमित शाहांपासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी अर्णब यांच्या अटकेचा निषेध केला आहे. त्यातच भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्रात महाविकासाघाडीकडून ‘अघोषित आणीबाणी’द्वारे लोकशाहीची हत्या असल्याचं म्हटलं आहे . यासंदर्भात त्यांनी स्वत:च्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट केलं आहे.
महाराष्ट्रात महाविकासाघाडीकडून ‘अघोषित आणीबाणी’द्वारे लोकशाहीची हत्या! लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारीता क्षेत्रावर हा मोठा आघात आहे. असे ट्विट गिरीश महाजन यांनी केले आहे.
तसेच, विरोधात भुमिका मांडली म्हणून अर्णब गोस्वामींविरूद्ध महाविकासआघाडी सरकारतर्फे सूडबुद्धीने केलेल्या कार्यवाहीचा जाहीर निषेध, असे महाजन यांनी म्हटलयं.
महाराष्ट्रात महाविकासाघाडीकडून ‘अघोषित आणीबाणी’द्वारे लोकशाहीची हत्या!
लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारीता क्षेत्रावर हा मोठा आघात आहे.विरोधात भुमिका मांडली म्हणून अर्णब गोस्वामींविरूद्ध महाविकासआघाडी सरकारतर्फे सूडबुद्धीने केलेल्या कार्यवाहीचा जाहीर निषेध!#ArnabGoswami pic.twitter.com/bEunI01JkH
— Girish Mahajan (@girishdmahajan) November 4, 2020
तसेच लोकशाहीच्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळा काढणारे सर्व ढोंगी पुरोगामी, सेक्युलर व तथाकथित निष्पक्ष पत्रकार या लोकशाहीच्या हत्येविरुद्ध, पत्रकारितेच्या गळचेपीविरुद्ध मौन का आहेत ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.