रायगड – इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज सकाळीच रायगड पोलिसांनी गोस्वामी यांना त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानावरून ताब्यात घेतलं होत.
गोस्वामींना ताब्यात घेतल्यानंतर अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या कथित चिठ्ठीमध्ये नावं असलेल्या फिरोज शेख व नितेश सारडा यांनाही अटक केली होती. या तिघांनाही पोलिसांनी रायगड न्यायालयात हजर केलं.
याबाबत सुनावणी करताना न्यायालयाने सकृत दर्शनी पुरावा न आढळल्याने सरकारी पक्षाची पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली. तसेच अर्णब गोस्वामी व इतर दोघांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, रायगड न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात गोस्वामी हे उद्या मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Anvay Naik suicide case: Republic TV Editor-in-chief Arnab Goswami and two others – Feroz Shaikh and Nitesh Sarda – sent to 14-day judicial custody by Alibag District Magistrate Court.
— ANI (@ANI) November 4, 2020
दरम्यान, अर्णब यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर त्यांचे वकील गौरव पारकर यांनी, ‘अर्णब यांना पहिल्याच सुनावणी वेळी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस कोठडीची मागणी फेटाळण्यात आली आहे. हे आमच्यासाठी मोठं यश आहे. आम्ही जामीन मळवण्यासाठी अर्ज दाखल केला असून याबाबतच्या युक्तिवादानंतर त्यावर उद्या निर्णय होईल” असं म्हंटलं आहे.
It’s a big victory for us. MCR (magisterial custody remand) is granted on the very first day. Police custody refused & magistrate custody granted. We’ve filed our bail application, it has been kept for arguments. It will be decided tomorrow: Arnab Goswami’s lawyer, Gaurav Parker https://t.co/BDLGJvSNK7 pic.twitter.com/YcDGnmpN7f
— ANI (@ANI) November 4, 2020
काय म्हटले आहे अन्वय नाईक यांच्या मृत्युपूर्व चिठ्ठीत ?
अर्णव गोस्वामी यांनी 83 लाख रुपये थकवल्याने आर्किटेक्ट अन्वय नाईक यांनी आणि त्यांच्या मातोश्रींनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येपूर्वी अन्वय नाईक यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ही चिठ्ठी पोलिसांच्या ताब्यात आली असून त्या चिठ्ठीत या साऱ्या प्रकरणाचा तपशिलाने नोंद करण्यात आली आहे.
त्यात चिठ्ठीत अन्वय नाईक यांनी म्हटले आहे की आम्ही खालील कारणामुळे आत्महत्या करीत आहोत. मी अन्वय नाईक आणि माझ्या मातोश्री कुमुद नाईक आम्ही दोघेही आमच्या कंपनीचे संचालक आहोत. खाली नाव नमूद केलेल्या व्यक्तींनी आमचे पैसे बुडवले आहेत.
1. अर्णव गोस्वामी, हे रिपब्लीक टीव्हीचे प्रमुख असून त्यांनी आमचे 83 लाख रुपये थकवले आहेत. त्यांच्या बॉम्बे डाईंग स्टुडिओचे काम आम्ही केले आहे.
2. स्की मीडियाचे फिरोज शेख. त्यांच्या अंधेरीतील आयडिया स्क्वेअर प्रकल्पातील तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याचे काम आम्ही केले त्याचे चारशे लाख रुपये त्यांच्याकडून येणे आहे.
3. स्मार्ट वर्क कंपनीचे मालक नितेश सारडा यांच्याकडेही आमचे 55 लाख रुपये पेंडिंग आहेत. या तिघांकडून हे पैसे वसूल करा आणि त्यांनाच आमच्या मृत्यूबद्दल जबाबदार धरा, असे अन्वय नाईक यांनी आपल्या मृत्युपूर्व नोंदीत स्पष्टपणे नमूद केले आहे.