चेन्नईः भारताने एआरस्ट्राईक करून उद्ध्वस्त केलेला बालाकोट येथील तळ पाकिस्तानने पुन्हा कार्यान्वित केला आहे. भारताने यापूर्वी केलेल्या कारवाईच्या पुढे जाऊन त्याला तोंड दिले जाईल, असा इशारा लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी आज चेन्नईत दिला.
भारताने जम्मू काश्मिरमधून कलाम ३७० रद्द केल्यांनतर पाकिस्तान बिथरला आहे,. भारताने एआरस्ट्राईक करून उद्ध्वस्त केलेला बालाकोट येथील ‘जैश ए मोहम्मद’च्या दहशतवादी तळ पाकिस्तानने पुन्हा एकदा सक्रिय केला आहेत. जवळपास ५०० दहशतवादी पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी आज चेन्नईत बोलताना दिली आहे.
रावत म्हणले कि, कलम ३७० रद्द झाल्यानंतर पाकिस्तानकडून उघडपणे असं सांगण्यात येतय कि आम्ही दहशतवादि पाठवू. दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करता येण्यासाठीच पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केले जात आहे. पाकीस्तानमध्ये इस्लाम धर्माचा गैरवापर केला जात असून धर्म गुरुंनी इस्लामचा खरा अर्थ लोकांना सांगायला हवा असेही रावत म्हणाले आहेत. तसेच आम्ही जर बालाकोट पर्यंत येऊ शकतो तर त्याच्यापुढेही जाऊ शकतो असा थेट इशारा लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला दिला आहे.
दरम्यान घुसखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना रोखण्यासठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहेत. भारतीय जवानांनी घुसखोरीचे अनेक प्रयत्न हाणून पाडले आहेत, असेही रावत म्हणाले.