श्रीनगर- भारताच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानी सैन्याकडून आज शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये पाकिस्तानच्या 3 सैनिकांना कंठस्नान घातलं आहे. त्यामुळे सीमेवर सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
Sources: 3 Pakistan Army soldiers killed in punitive proactive response after ceasefire violations by Pakistan Army. Ceasefire violations taking place in Uri and Rajouri sectors. #JammuAndKashmir https://t.co/gjRpQ1wwmx
— ANI (@ANI) August 15, 2019
पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानने सकाळी सात वाजल्यापासूनच गोळीबार सुरू केला आहे. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतानेही जशास तसे उत्तर देत पाकिस्तानी सैन्याचं कंबरडं मोडलं आहे.