अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर हे भाऊ-बहीण अनेकदा एकत्र दिसले आहेत. त्यांच्या नात्याविषयी अनेक गोष्टी बोलल्याही जात असतात.
सावत्र भाऊ-बहीण असल्यामुळे त्या दोघांच्यातील नात्यामध्ये एक अनामिक अंतर असल्याची चर्चाही बी-टाऊनमध्ये ऐकायला मिळायची; परंतु या दोघांच्या नात्यामध्ये साचलेला बर्फ आता वितळायला सुुरुवात झाली आहे.
मध्यंतरी, पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे एका फॅशन शोमध्ये फॅशन डिझायनर अनामिका खन्नाचे शो स्टॉपर म्हणून हे दोघे दिसले. यावरून या दोघांच्या नात्यामध्ये कडवटपणा असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले.
या शोमध्ये बहिणीचा हात धरून चालणे, तिला मार्गदर्शन करणे हे सर्व एका सख्ख्या भावाप्रमाणे अर्जुन करत होता. दुसरीकडे, जान्हवी कपूरही म्हणते की, लहानपणी भावासोबत राहू शकले नाही, याचे आजही वाईट वाटते.
अर्जुन अत्यंत प्रेमळ हृदयाचा आहे. थोडक्यात, या दोघा भावाबहिणींमध्ये संवादाच्या, प्रेमाच्या तारा जुळू लागल्या आहेत. त्यामुळे त्यात उगाचच कोणी मोडता घालू नये हेच योग्य !