मुंबई – राज्यातील मंदिरं खुली करण्याबाबत राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहलेलं पत्र आणि त्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी दिलेलं प्रतिउत्तर यांमुळे वादळी चर्चा रंगल्या आहेत. राज्यपालांच्या पत्रात वापरण्यात आलेली भाषा ‘घटनेला’ धरून नसल्याचं अनेकांनी म्हंटलंय. तर मुख्यमंत्र्यानी राज्यपालांना राजकीय उत्तर द्यायची गरज नव्हती असंही मत व्यक्त करण्यात येत आहे.
हे प्रकरण आता चांगलंच तापलेलं असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी, ‘राष्ट्रपती व पंतप्रधानांनी राज्यपाल धर्मनिरपेक्ष आहेत की नाहीत याची खातरजमा करून घ्यावी,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्राचे अमोल कोल्हेंकडून कौतुक; म्हणाले…
एका नामांकित वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना राऊत, ‘आमच्या हृदयात आणि आचरणात हिंदुत्व असलं तरी देश ज्या घटनेवर चालतो ती धर्मनिरपेक्ष आहे.’ असं देखील म्हणाले.
काय म्हणाले संजय राऊत?
“देशाच्या घटनेचा भाव हा धर्मनिरपेक्ष असून पंतप्रधान, राष्ट्रपती आणि राज्यपाल ही पदं देखील धर्मनिरपेक्ष आहेत. आमच्या हृदयात आणि आचरणात हिंदुत्व असलं तरी देश ज्या घटनेवर चालतो ती धर्मनिरपेक्ष आहे.”
माझ्याकडे ना घर… ना दार… मग बुल्डोजर सरकार पाडणार काय?
“जर राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या धर्मनिरपेक्षतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतील तर राष्ट्रपती व पंतप्रधानांनी राज्यपालांना ते धर्मनिरपेक्ष आहेत की नाहीत याबाबतची विचारणा करायला हवी. कोणालाही मंदिरं बंद ठेवायची नाहीयेत मात्र आम्हाला लोकांचे जीव वाचवायचेत.”
If the (Maharasthra) Governor raises questions on the secularism of the CM, the President & the PM should ask the Governor if he is secular or not. No one wants to keep temples shut but we have to save people’s lives: Shiv Sena MP Sanjay Raut https://t.co/hJml0Hiuz0
— ANI (@ANI) October 15, 2020
राज्यपाल-मुख्यमंत्री पत्रयुद्ध
राज्यातील मंदिरं उघडण्याबाबत राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल एक पत्र लिहलं. या पत्रामध्ये त्यांनी तुम्ही हिंदुत्ववादाचे कट्टर समर्थक असतानाही मंदिरं कुलूपबंद का? असा प्रश्न उपस्थित केला. यासोबतच त्यांनी, ‘मंदिरं न उघडण्याबाबत तुम्हाला दैवी संकेत मिळतात का?’ असा प्रश्नही उपस्थित केला होता.
मुख्यमंत्र्यांनी ‘एकच’ मारला, पण सॉलीड मारला!
या पत्राला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी, ‘मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांची हसत स्वागत माझ्या हिंदुत्वात बसत नाही.’ असा टोला लगावला. यासोबतच त्यांनी आपल्याला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नसल्याचेही म्हंटले.