आजकालच्या प्रदूषणयुक्त वातावरणात आणि धावपळीच्या युगात आरोग्य संपन्न आयुष्य जगण्याकरीता प्रत्येकजण पोषक अन्न आणि शुद्ध पाणी मिळविण्यासाठी जागृत असताना कन्झुमर प्रोडॅक्टस् उत्पादन करणाऱ्या उत्पादक कंपन्यांचीही जबाबदारी तेवढीच वाढली आहे. यामुळेच केवळ शुद्धच नव्हे तर नैसर्गिक घटकांचा समावेश असलेले निर्मळ पाणी बाटली बंद (मिनरल वॉटर)उत्पादीत तसेच विकण्याचा व्यावसायही तेवढाचा जबाबदारीचा झालेला आहे. हिच बाब लक्षात घेत भोर तालुक्यातील भाटघर धरणालगत उभारण्यात आलेल्या अमृतम् ऍक्वा कंपनीतून ग्राहकांकरीता अतिशुद्ध बाटली बंद पाण्याचे उत्पादन केले जात आहे. विशेष, म्हणजे नैसर्गिक पाण्यातील घटक जपून पाणी शुद्ध केले जात असल्याने अमृतम्च्या बाटलीबंद शुद्ध पाण्याची मागणी राज्यभरातून वाढत आहे.
सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या भोर तालुक्यातील नीरा देवघर तसेच भाटघर धरणातील निसर्गातील घटकांनी परिपूर्ण असलेल्या पाण्याचा स्त्रोत नीरानदीच्या माध्यमातून लाभल्याने अमृतम्च्या पाण्याला नैसर्गिक गोडी लाभली आहे. हीच गोडी जपण्याचा प्रयत्न अमृतम् ऍक्वाने केला आहे.
हिरवागार निसर्ग तसेच धरणांच्या कुशीत 2016 मध्ये भाटघर धरणालगत अमृतम ऍक्वा नावाने कंपनी स्थापन झाली. संगमनेर (ता. भोर) येथे भोर-कापुरहोळ रस्त्यालगतच कंपनी असल्याने दळण-वळणाची सुविधा असल्याने अगदी गावातील लोकांपासून ते राज्यभरातील ग्राहक या कंपनीला मिळाला आहे.कंपनीत सध्या शुद्ध पाणी बाटलीचे “ओरिसन’ या नावाने उत्पादन होत आहे. विशेष म्हणजे निसर्गातील घटक जपतानाही येथे सहा प्रकारे पाण्याचे शुद्धीकरण (फिल्टर) होत असल्याने पाण्याची गुणवत्ताच नव्हे तर ते आरोग्याच्या दृष्टीने अगदी शंभर टक्के सुरक्षित मानले जाते आहे. विशेष म्हणजे याकरीता शासनाचीच नव्हे तर ग्राहकांचीही मानांकनेही अमृतम्च्या या उत्पादनाला मिळालेली आहेत. केवळ आकर्षक बाटलीत पाणी भरण्यापेक्षा जंतुविघातक (हायजिनीक) पद्धतीने बाटली स्वच्छ करून यामध्ये पाणी भरले जात आहे. मानवरहीत यंत्राद्वारे बाटलीबंद पाणी उत्पादीत होत असल्याने कंपनीच्या या उत्पानास मोठी मागणी वाढलेली आहे. केवळ व्यावसायावर लक्ष केंद्रीत न करता व्यवस्थापनाने येथील पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी कंपनीच्या आवारात शोभेची झाडे लावलेली आहेत. कर्मचारी वर्ग कंपनीत स्वच्छतेला प्राधान्य देत असून कंपनीचा संपूर्ण परिसर स्वच्छता ठेवण्यावरही भर दिला जात आहे.
अमृतम् ऍक्वाच्या उत्पादनास भोर परिसरासह, वरंधा घाट, महाड, वाई, बारामती, शिरवळ, खंडाळा, सातारा तसेच पुणे जिल्ह्यातून मोठी मागणी आहे. पुणे शहरात बहुतांशी ठिकाणी अमृतम्चे शुद्ध पाणी पुरविले जाते. राज्यभरात विस्तार वाढविण्याचे कंपनीचे ध्येय असून एजन्सीसाठी येग्य विक्रेत्यांचा शोध घेतला जात आहे. पात्रता असलेल्या होतकरू युवकांनी 9822335321 व 982283393 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे.
(संकलन : बाळासाहेब बांदल, भाटघर)