पाचगणी – जावळी तालुक्याचे सुपुत्र, गत दोन दशकांहून अधिक काळ बोंडारवाडी धरणाच्या मंजुरीकरीता अथक कष्ट घेत संघर्ष उभे करणारे बोंडारवाडी धरण कृती समीतीचे अध्यक्ष विजय मोकाशी यांचे तीव्र हदयविकाराच्या धक्क्याने आज निधन झाले. मेढा येथे आयोजीत शोकसभेत रखडलेल्या बोंडारवाडी धरणाला शासनाकडून मंजुरी घेणे हीच विजय मोकाशी यांना खरी श्रद्धाजली असेल, अशी भावना व्यक्त करण्यात येत होती .
जावळी तालुक्याचा प्रमुख जलसिंचन प्रकल्प कित्येक वर्षे रखडला आहे . बोंडारवाडी धरणाच्या जलसिंचन प्रकल्पाकरीता आयुष्य वेचणारे विजय मोकाशी यांचे निधन काल मुंबई येथे त्याच्याच जन्म दिवसाच्या केक कापताना आलेल्या हदयविकाराच्या धक्क्याने झाले. जावळीकरांना हा धक्का कधीच सहन होणारा नाही. बोंडारवाडी धरणाची जलसिचंन विभागाकडे मागणी करण्यापासून शासनाला जाग करण्याकरीता वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याच काम त्यांनी केले.
विजय मोकाशी यांचा लढा बोंडारवाडी धरणाचं पाणी जावळीतील ५४ गावांच्या शेतक-यांना शेती करीता वापरात यावे याकरीता विजय मोकाशी यांनी संघर्ष केला. या भूमीपुत्राकरीता जावळीकरांनी साश्रु नयनांनी बोंडारवाडी धरणाला मंजुरी हीच विजयराव मोकाशी यांना श्रद्धाजली ही भावना व्यक्त करत अखेरचा निरोप दिला. यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, शिवसेना संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, माजी सभापती जयश्री गिरी, माजी सभापती मोहनराव शिंदे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे , माजी अर्थ व शिक्षण सभापती अमित कदम यांच्यासह महिलावर्ग देखील उपस्थित होते.