नगर (प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या वन पर्यावरण समितीची पुनर्रचना करण्यात आली असून, त्या समितीवर राज्य सरकारच्या आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे.
प्रकाश जावडेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. त्यात सामाजिक, पर्यावरण, उद्योग तसेच अन्य क्षेत्रातील मिळून 11 सदस्यांची समिती आहे. समितीमार्फत पडजमिनी वनाच्छादित करणे, जंगलतोड थांबविणे, पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने शहरी व ग्रामीण भागात हरितपट्टे निर्माण करणे ही प्रमुख उद्दिष्टे आहेत.
शाळा, महाविद्यालये, उद्योगक्षेत्र, आजी-माजी सैनिक संघटना, खासगी स्वयंसेवी संस्था या सर्वांच्या सहार्यातून वृक्षलागवड वृक्षसंवर्धन व जनजागृतीवर काम केले जाणार आहे.