सातारा, – कृषी विभागामार्फत 2024-25 च्या रब्बी हगांमात सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकर्यांसाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पिकांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील शेतकर्यांनी भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकर्याची स्वत:च्या नावे जमीन आवश्यक असून, ती तो स्वत: कसत असावा. शेतकर्याच्या शेतावर किमान 40 आर क्षेत्रावर लागवड असणे आावश्यक आहे. एका शेतकर्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभागी होता येईल.
शेतकर्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज, प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12 व 8 अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), बँक पासबुक व 7/12 वर घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित नकाशा आदी कागदपत्रे जोडून, 31 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.