गेल्या काही महिन्यांपासून अनुष्का शर्मा कोणताही नवीन सिनेमा स्वीकारायला तयारच नाही. काही निर्माते आणि दिग्दर्शक तिला आपल्या नवीन सिनेमामध्ये घेण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र अनुष्काने कोणालाही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. तिने गेल्या वर्षी “झिरो’ केला होता. त्यानंतर तिने कोणताही नवीन सिनेमा केलेला नाही. ऍक्टर म्हणून तिने आपले काम कमी केले आहेच. त्याच बरोबर तिने प्रॉडक्शनचे कामही कमीच ठेवले आहे. एवढेच नाही, तर बॉलिवूडमध्ये एवढे इव्हेन्ट्स होत असतात, पार्ट्या होत असतात. पण त्यापैकी कशातही अनुष्का सहभागी होत नाही आहे.
आता अनुष्काने बॉलिवूडला अलविदा म्हणायचा विचार करायला सुरुवात केली आहे, असेही बोलले जाऊ लागले आहे. तिच्या अशा निर्णयामागे विराट कोहलीने तिला काही सांगितलेले असू शकते. अनुष्काने आता आपले घर आणि आपल्याकडे अधिक लक्ष द्यावे, अशी विराटची अपेक्षा असल्याचे समजते आहे. ऍक्टिंग करताना कलाकाराला दिवसाचे 8-8 तास काम करावे लागते. काही वेळेस नाईट शिफ्टही करावी लागते. जाण्याची वेळ निश्चित असते, मात्र येण्याची वेळ निश्चित नसते. त्यामुळेच विराटने अनुष्काला काम कमी करण्याची सूचना केली असावी, असे निरीक्षकांचे म्हणणे आहे.