नवी दिल्ली – राजस्थानस्थित कोटामधील एका रुग्णालयात धक्कादायक बाब समोर आली आहे. जे.के. लोन रुग्णालयात महिन्याभरात १०० बालकांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. एवढेच नव्हे तर गेल्या दोन दिवसातच ९ बालकांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर अनुराग कश्यपने सरकारवर ट्विट करत निशाणा साधला आहे.
What is wrong with the administration .. how do they even allow this to happen.. and why does one have to wait for so many children to die before taking cognizance of it .. https://t.co/oqyNFbVLqf
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) January 2, 2020
दरम्यान, अनुराग कश्यप यांनी कोटामधील एका रुग्णालयातील घटना धक्कादायक आहे. रुग्णालयात महिन्याभरात १०० बालकांचा मृत्यू झाल्याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे की,’प्रशासनाला नेमकं हवं काय आहे ? ते असे सर्व कसे होऊ देऊ शकतात, ही माहिती मिळण्यापूर्वी इतक्या प्रमाणात बालकांचा मृत्यू होऊ कसा शकतो.’ अशी प्रतिक्रिया देत सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, कोटामधील रुग्णालयात डिसेंबर २०१९ मध्ये महिन्याभरात या रुग्णालयात ७७ बालकांचा मृत्यू झाला होता. ३० डिसेंबर रोजी ४ आणि ३१ डिसेंबर रोजी या रुग्णालयात उपचारांदरम्यान ५ बालकांचा मृत्यू झाला आहे. जन्मावेळी वजन कमी असल्याने हे मृत्यू झाले असल्याचे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुरेश दुलारा यांनी सांगितले आहे.