हैद्राबाद- २०१९ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जोरदार पराभव स्वीकारावा लागला आहे. या पराभवतून अजून काँग्रेस पूर्णपणे सावरलेली नसतानाच, पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्त्यता आहे. तेलंगणातील काँग्रेसच्या १८ पैकी १२ आमदारांनी तिथल्या विधानसभेच्या अध्यक्षांची भेट घेतली आहे. आपल्या गटाला तेलंगाणा राष्ट्र समिती या पक्षामध्ये विलीन होण्यास मंजुरी द्यावी अशी मागणी या आमदारांनी केली आहे.
त्यामुळे आता, १८ मधले १२ आमदार गेले तर काँग्रेसचे फक्त ६ आमदार या ठिकाणी उरतील.
Hyderabad: 12 Congress MLAs met Telangana Assembly Speaker, Pocharam Srinivas Reddy and gave him a representation to merge the Congress Legislature Party with the ruling Telangana Rashtra Samithi. pic.twitter.com/oex4TZpZ8i
— ANI (@ANI) June 6, 2019