मुंबई – कॉर्डिलियावरची पार्टी जर एफ टीव्हीचे इंडिया हेड काशिफ खान यांनी आयोजित केली होती. तर त्यांना अटक का झाली नाही, असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे. तसेच काशिफ खान आणि समीर वानखेडे हे घनिष्ठ मित्र असल्यानेच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी बुधवारी क्रूझ पार्टीमध्ये एक दाढीवाला असल्याचा आरोप केला होता. तो हा काशिफ खान असल्याची माहिती आहे. काशिफ खान फॅशन टीव्हीचा एमडी आहे. त्यानेच कॉर्डिलिया क्रूझवर पार्टी आयोजित केली होती.
मलिक यांनी म्हटले होते की, क्रूझ पार्टी प्रकरणात एक बाब समोर आली की या पार्टीत एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सप्लायर होता. त्याठिकाणी त्याची गर्लफ्रेंड देखील होती. बंदूक घेऊन तो दाढीवाला त्याठिकाणी होता. त्याची समीर वानखेडेंसोबत मैत्री आहे. गोव्यात देखील यांनी मोठे व्यवहार केले होते, असा आरोप मलिक यांनी केला आहे.
आम्ही एनसीबीला सांगितले होते की एक दाढीवाला व्यक्ती होता. त्याची मैत्रीण देखील त्याठिकाणी होते. त्यांचे अनेक व्हिडिओ आमच्याकडे आहेत आम्ही ते व्हिडिओ देऊ, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आर्यनला जामीन मिळाल्यानंतर नवाब मलिक यांनी अगदी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली. मलिक यांनी आर्यनला जामीन मिळल्यानंतर फिल्मी स्टाइलमध्ये ट्विटर केले की, “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ असे म्हणत सूचक इशारा दिला आहे.