अहमदाबाद – चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एम.एस.धोनी आपल्या करिष्माई नेतृत्वासाठी ओळखला जातो. मात्र, धोनी केवळ मैदानावरच नाही तर मैदानाबाहेर देखील नेतृत्वाची जबाबदारी पार पाडत असतो.
आयपीएल रद्द झाल्यानंतर अनेक खेळाडूंना घरी परतण्यासाठी अडचणी येत आहेत. याच संदर्भात एक निर्णय घेत धोनीने सगळ्यांची मने जिंकली आहेत. एक कर्णधार म्हणून मैदानासह मैदानाबाहेरदेखील जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.
खेळाडूंची काळजी मैदानातच नाही तर मैदानाबाहेरदेखील घ्यावी लागते. हीच बाब लक्षात घेऊन धोनीने जोवर चेन्नईचे सगळे खेळाडू घरी परतत नाहीत, तोपर्यंत घरी न जाण्याचा निर्णय घेतला आहे.