हिंगोली – कॉग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली आहे. डोंगरकडा ता. कळमनुरी येथे हि यात्रा दाखल झाली आहे. या यात्रेत युवासेना नेते माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज दुपारी सहभागी झाले. आदित्य ठाकरे पायी चालत राहुल गांधी यांच्याशी चर्चा करत होते. सध्या राज्यात महाविकास आघाडीत कॉग्रेससोबत मित्रपक्ष आहेत. राष्ट्रवादी, कॉग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असल्याने आज माजी पर्यावरण मंत्री आणि युवा सेना नेते आदित्य ठाकरे हे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.
ठाकरे गटाचे पदाधिकारीही यात्रेत दाखल –
यात्रेच्या स्वागतसाठी भव्य महाद्वार उभारण्यात आले होते व मापडी पोतराज आदिवासी बांधव, शेतकरी मजूर, गोंधळी, बंजारा बांधाव आणि कॉंग्रेसचे पदाधिकारी मोठ्या उत्साहाने या यात्रेत सहभागी झाले होते. यांसह आदित्य ठाकरे व त्यांच्या सोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व ठाकरे गटाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या स्व. राजीव सातवांच्या नगरीत आहे, मात्र राहुल गांधींच्या स्वागतासाठी त्यांचा जिगरी दोस्त सातव राहुल यांच्यासाठी हा भावनिक क्षण होता.
भारत जोडो यात्रेत पन्नास खोके एकदम ओक्केचे नारे –
भारत जोडो यात्रा चोरांबा फाटा येथे पोहचली त्यावेळी आदित्य ठाकरे व त्यांचे कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले. ते नागरिकांनासोबत काही वेळ बोलत चालल्यानंतर राहुल गांधी यांच्याशी देखिल चालत चालत चर्चा केली. यांचवेळी त्यांच्या काही पदाधिकारी यांनी पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा देत शिंदे गटाला पुन्हा डीवचले.
यात्रेत काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार प्रज्ञा सातव, शिवसेनेचे आमदार राहुल पाटील आदींसह राज्यातून आलेली काँग्रेसची नेतेमंडळी सहभागी झाली होती.
हिवरा फाटा येथून राहुल गांधी यांनी आपल्या पायांचा वेग वाढविला. रस्त्यात ते काही जणांना जवळ बोलावून बोलताना दिसत होते. शालेय मुले, युवक, डॉक्टरांसह विविध क्षेत्रातील मंडळीचा यात समावेश होता. रस्त्याने चालत असतानाच ते या मंडळींशी विविध विषयांवर चर्चा करीत होते. दुहेरी कठडे, सीआरएफ व स्थानिक पोलीस अशा दुहेरी सुरक्षा व्यवस्थेत त्यांचा हा ताफा अवघ्या काही वेळातच डोंगरकडा येथे पोहोचला.
हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक नेते माजी खासदार सुभाष वानखेडे, संपर्कप्रमुख बबन थोरात, विनायक भिसे, गोपू पाटील, कृष्णराव पाटील, नांदेडचे दत्ता कोकाटे, बालासाहेब देशमुख आदींसह कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ५० खोके एकदम ओके अशा घोषणाही दिल्या.