मुंबई – आज महाराष्ट्रातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा पार पडला असून नव्या सरकारमध्ये एकूण ३६ मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्रीपद वाट्याला आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने ‘भाजप’ प्रकरणानंतर देखील अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे.
दरम्यान, भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदावरून चांगलाच टोमणा मारला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता कोणतीही विचारसरणी, तत्व, नीतिमूल्यं उरली नाहीत असं देखील म्हंटल आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी राज्यातील तीन वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये अजित पवारांनी भूषविलेल्या उपमुख्यमंत्रीपदाचा दाखला देताना त्या लिहतात,
“अजित पवार…
उपमुख्यमंत्री
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार
भाजपा-एनसीपी सरकार
शिवसेना – राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकार
महाराष्ट्राच्या राजकारणाचा विजय असो!”
Ajit Pawar….
Deputy Chief Minister in
Congress-NCP Government
BJP -NCP Government
Shivsena – NCP – Congress Govt
Maharashtra Politics ki Jai Ho !
No ideologies, No Principles, No ethics.#RIPFightAgainstCorruption
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 30, 2019