नवी दिल्ली : एकेकाळी टेलिकॉम क्षेत्रात दमदार कामगिरी करणारी रिलायन्स कम्युनिकेशन कंपनी सध्या दिवाळखोरीत निघाली आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात कंपनीला ३०,१४२ कोटींचा तोटा झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर अनिल अंबानी यांनी शनिवारी रिलायन्स कम्युनिकेशनच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान अनिल अंबानी यांच्या समवेत छाया विरानी, रायना करानी, मंजरी कैकर आणि सुरेश रंगाचर यांनीही संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीवरील कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे रिलायन्स कम्युनिकेशनने दिवाळखोरी जाहीर केली आहे.
Reliance Communications Limited: Anil Dhirubhai Ambani along with four other directors, Chhaya Virani, Ryna Karani, Manjari Kacker & Suresh Rangachar, have tendered their resignation from the post. pic.twitter.com/TxQG31taz4
— ANI (@ANI) November 16, 2019
कॉर्पोरेट विश्वात व्होडफोन-आयडिया यांच्या तोट्यानंतर एखाद्या कंपनीला झालेला हा सर्वाधिक तोटामानला जात आहे. दिवाळखोरी जाहीर केल्यानंतर कंपनीच्या मालमत्तांची विक्री करण्यास सुरवात झाली होती.