पंचनामे झाले, मदत जाहीर झाली पण पैसे गेले कुठे; संतप्त शेतकऱ्यांचा सवाल
नाशिक: नाशिक विभागातील द्राक्ष बागायतदारांच्या ओझर येथील बैठकीत संतप्त शेतकऱ्यांनी गिरीश महाजन यांना धारेवर धरले. नुकसानीचे पंचनामे होऊन, मदतीचे आश्वासन देऊनही शेतकऱ्यांना मदत का मिळाली नाही? गेल्यावेळची मदतीची रक्कम गेली कुठे? असा सवाल शेतकऱ्यांनी गिरीश महाजन यांना केला.
दरम्यान, राज्यात पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. मात्र गेल्यावेळी पंचनामे झाले, मदत सुद्धा जाहीर झाली पण शेतकऱ्यांना मिळाली नाही. ती मदत गेली कुठे? असा प्रश्न संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.